Saturday, 25 January 2020

निरामय_आरोग्यवर्धिनी - ३.२

#निरामय_आरोग्यवर्धिनी - .

आपण पहिल्या लेखात आरोग्याचे प्रामुख्याने तिन भाग केलेमानसिक आरोग्यआहार  शारीरीक आरोग्याचा/मेहनतीचा असे हे तिनभाग आहेतप्रत्येक भागाचे मुल्यमापन आपल्याला करायचे आहे. लेखात आपण मानसिक आरोग्याचे मुल्यमापन केलेआता .मधे आहाराकडे वळु या

  • मानसिक आरोग्याचे मुल्यमापन - लेख .
  • आहाराचे मुल्यमापन - लेख .
  • शरीराचे मुल्यमापन - लेख .

हा लेख केवळ आहाराचे मुल्यमापन . आहेपुढील भागात शरीराचे मुल्यमापन करणार आहोत.

**आहाराचे मुल्यमापन**

तुमच्या शरीराला लागणारे अन्न तुमच्या आरोग्याचे महत्वाचे कारण आहेतशरीराला मेहनत जशी महत्वाची तसेच योग्य आहारमहत्वाचापरंतु इथे तो आपण किलो किंवा कॅलरीमधे मोजण्याची चुक करणार नाहीतकारण माझा दृढ विश्वास आहे की तुमच्याशरीराची गरज समजाऊन घेऊन तुम्ही आहार नियमन करावयास हवेतुमचे मेटाबाॅलिझम (शरीराचा अन्न उर्जेत रुपांतरीत करण्याचा दरलक्षात घेणे महत्वाचे आहेअचानक आहार कमी करुन किंवा बदलुन तुम्ही शरीरास हानी पोहोचवालशरीराशी हितगुज करुन आहारवाढवणे किंवा कमी करणे योग्यकेवळ ढोबळमानाने स्त्रीयांना २००० कॅलरी लागतात  पुरुषांना २५०० कॅलरी लागतात म्हणुनपोळीच्या कॅलरी मोजण्यात अर्थ नाहीमुळात हे प्रमाण योग्य प्रमाणात मेहनत करणाऱ्यांसाठी सरासरी अपेक्षित आहेबहुतेक जणांचीदिनचर्या ही ॲाफिस मधे बैठी आहेतेव्हा त्याप्रमाणात आहारात बदल हवाचकॅलरीच्या बाबतीत लोकांच्या मनात अजुन काहीगैरसमज आहेत ते पहा१०० ग्रॅम शिजवलेल्या काबुली छोल्यात ढोबळमानाने २७० कॅलरीज आहेतपरंतु काहींचे पोट छोले योग्य रितीने पुर्ण पचवु शकत नाहीतेव्हा एकुन पचनी पडणारा भाग हा कमी होणारउलट आहे त्या छोल्यांना पचनाला लागलेले अधिकीचे श्रमतुमची शक्ती / कॅलरी जाळणारअश्या परिस्थितीततुम्ही छोल्यातून मिळालेली कॅलरी  प्रोटीन त्या पाकीटावर लिहिलेली धरली तर तेकिती चुक होईलप्रत्येकाला अन्नातून मिळणारी शक्ती किंवा प्रोटीनविटामीन ही सारखी असु शकत नाहीती व्यक्तीपरत्वे बदलतेमुळात शरीराचे  त्यातुन मिळणाऱ्या खुणासिग्नल्स यांचे परिक्षण वाढवाखाण्याच्या पाकिटांवरील कॅलरीजची आकडेमोड वाचा पणफार मनावर घेऊ नका

दुसरी महत्वाची गोष्ट जी पाश्चिमात्य देशात अत्यंत चुकीची आहे ती म्हणजे प्रोटीन (प्रथिनेसप्लिमेंटस (शेक्सघेणे किंवा प्रोटीन हवेम्हणुन मांसाहाराचे समर्थन करणेह्याचे प्रस्थ पाश्चिमात्य देशात अवास्तव आहेच पण भारतात देखील हा रोग पसरतोयमुळात प्रोटीन हेफक्त आणि फक्त वनस्पती बनवतातप्राणी फार तर एका प्रकारचे प्रोटीन दुसऱ्या प्रकारात रुपांतरीत करु शकतात मी मुळातकुठल्याही सप्लिमेंटसच्या (अगदी विटामीनच्याहीविरोधात आहेज्या गोष्टींची कमतरता आहे त्यांचे (disintegration ) पृथक्करणशरीराने अन्नातून केलेले कधीही योग्यतुम्ही कुठल्या डिफिशीएंसीमुळे दवाखाण्यात ॲडमिट असाल तर काही दिवस डाॅक्टरांच्यासल्ल्याने सप्लिमेंटस वर काढणे मान्य आहेपरंतु सप्लिमेंटसचे नियमित सेवन हा तुमच्या आहारातला दोष दर्शवतोतो दोष दुरुस्त करणेहा योग्य उपाय आहेशरीरास आवश्यक प्रोटीन्स शरीर अन्नातून काढतेप्रोटिन्स डिफिशियन्सी हा वैद्यकिय शास्त्रात अस्तित्वातनसलेला सिद्धांत आहेशक्तिचे काही प्रमाणात श्रेय हे जिन्सना देखील जातेत्याचे उदाहरण म्हणजेपुर्व आफ्रिकेचेच पळण्याच्याशर्यतीत सहसा जिंकतात यात आहेस्टॅमिना किंवा शक्ती वाढवायची असल्यास आहार कष्टाच्या प्रमाणात वाढवला की प्रोटीन्सचीकमतरता भासणार नाहीनिसर्गात सर्वात शक्तिशाली प्राणी हे शाकाहारी आहेतउदाहत्तीगेंडागोरील्लाअस्वलत्यामुळे केवळशक्ती मिळविण्यासाठी करण्याच्या मांसाहारास मी मिथ्या मानतोमनुष्याने निसर्गाची कमीतकमी हानी होणारा आहार निवडावाफुडचेन मधे तुम्ही जितक्या खाली तुमचा आहार न्यालतितका तुमचा निसर्गावर पडणारा बोजा कमीवनस्पती ह्या फुडचेन मधे सर्वातखाली आहेतत्याच्यावरती वनस्पतींवर जगणारे कोंबडीगायशेळीनंतर त्या प्राण्यांवर जगणारेनंतर ह्यांना खाणाऱ्या प्राण्यांवरजगणारेमुळ मुद्दा हा की तुमच्या आहाराने होणारा निसर्गाचा ऱ्हास कमीतकमी करा  संतुलीत पौष्टिक शाकाहार स्विकाराअंडेशाकाहारी की मांसाहार ही चर्चा तुर्तास बाजुला ठेवुततसेच आहार शाकाहाराकडे वळवल्यास वजन कमी होण्यास गती मिळते हेनक्की.

वरती आहारात काय करु नये हे मांडले आहेआता मुळ मुद्दा आहाराच्या मुल्यमापनाचा घेऊयातह्यात तुम्हाला बऱ्याच अप्रत्यक्ष सुचनामी दिनचर्येच्या विश्लेषणात दिल्या आहेतत्यांना इथे वापरुन आपण आहाराचे मुल्यमापन करणार आहोत

आहाराचे मुल्यमापन तिन घटकांमधे करणे योग्य ठरेल.

  1. नियमीतपणाजेवणाची वेळ योग्य ठेवणे तसेच ती ९०पेक्षा जास्त वेळा पाळणेहे तुमच्या कडुन होते कानसेल होत तरत्याकरता तुम्हाला काय करता येईलइतर काही बंधनं कमिटमेंट यांची तडजोड करुन शक्यतो वेळ पाळाचतुमच्या आरोग्याशीतुमची कमिटमेंट सर्वोपरी आहेखाली काही वेळेबाबतीत सुचना आहेतत्यापाळता आल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल
    • नाश्तावेळा निश्चित होण्यासाठी तुमची उठण्याची वेळ नियमित हवीसकाळी शक्यतो लवकर उठून - च्या दरम्यानतुमचा नाश्ता झाला पाहीजेसकाळी -:३० मधे उठूनशक्यतो २०-३० मिनिटे व्यायाम  शुचिर्भुत होऊन नाश्ता करावा.
    • जेवणदुपारचे जेवण साधारण १२-१३:०० दरम्यान व्हावेतुमची सवड पहा परंतु त्या वेळेत नियमितपणा आणा९०पेक्षा जास्त ती वेळ पाळली गेली पाहीजेत्याला कारणं देऊन स्वतःच्या आरोग्यास गमावून बसायचे का वेळ पाळायची तेतुम्ही ठरवायचे
    • १३:००-१७:०० वेळेत भुक लागल्यास तुम्ही काय खाताबिस्किटे किंवा इतर समोसे सारखे पदार्थ टाळाशक्यतो ताकदुधगरम पाणी अथवा फळांचा उपयोग करा.
    • जर वजन कमी करायचे असेल तर संध्याकाळी मात्र जेवण बंद करावयास हवेमी स्वतः बऱ्याच दिवशी संध्याकाळी दोनअडीच ग्लास ताक/मठ्ठा करुन पितोदिवसभरात भरपुर अंग मेहनत असेल तर हलका आहार १९:०० च्या आत व्हायलाहरकत नाहीपरंतु त्यानंतर काहीही नकोयाचा परिणाम हा होईल की तुम्ही सकाळी भूकेपोटी लवकर उठालसकाळीनाश्ता जास्त पोटात जाईलहे चक्र सुरु होण्यास थोडं कठिण मात्र सुरळीत झाल्यास जोरदार परिणाम देतेहा माझातसेच बऱ्याच जणांचा अनुभव आहेत्यामागे शास्त्रीय कारणं देखील आहेतबरीच मंडळी दुपारी :०० च्या जेवणानंतरकाहीच जेवण नाही पाहुन थबकतीलपरंतु तुमच्या आरोग्याची तुम्हाला काळजी असेल तर हा प्रयोग कराचही माझीआग्रहपुर्वक विनंती आहेसवय होईपर्यंत संध्याकाळी हवं तर फळ खानंतर ताकावर याताक पोटभर प्यापरंतु १९:००वाजेच्या आत पिणे होईल असे पहाडायबिटीज वाल्यांनी त्यांच्या शुगर लेव्हल वर लक्ष ठेऊन हा प्रयोग कराताकाचेप्रकार  परिणाम यांवर आयुर्वेदात बरीच माहीती आहेकाही महत्वाचा तपशील मी इथे आहारात खाली दिला आहे
  2. गुणवत्ताआहारातील भाज्याधान्य ह्यांची गुणवत्ता (रासायनिक खत  वापरता-ॲारगॅनिकताजेस्वच्छहवीचतसेच प्रोटीनव्हिटामीन सुरक्षीत ठेवण्याची रेसीपी (पाककृतीची क्षमता जाणुन घेणे महत्वाचे.
    • तुम्ही खरेदी करत असलेल्या भाज्या शक्यतो ताज्या  जैविक खत वापरलेल्या (organic) असाव्यातत्यासाठी नेहेमीच्याभाजीवाल्याकडे पाठपुरावाप्रयत्न करातोच प्रकार धान्याचा आहेसध्या बरीच दुकानं ॲारगॅनिक भाज्याधान्य सप्लायकरतात.
    • प्रत्येक रेसीपी ही अन्नातील घटक पचनास योग्य किंवा अयोग्य करतेत्याबरोबर रेसीपी अन्नातील पोषक तत्वांचा काहीप्रमाणात नाशही करतेतो कमीतकमी व्हावा ही काळजी घेणे आवश्यक आहेउदाहरणाखातर घ्यायचे तरकडधान्यकुकरमधे वाफवुन नंतर भाजीत शिजवले तर कमी वेळ शिजवावे लागतातपर्यायाने अन्नातील पोषक तत्वे टिकतात.
    • तुमच्या घरात फ्रिजर किती मोठं  त्यात किती सामान आहे ह्यावरुन देखील तुमच्या आरोग्याचे मुल्यमापन करता येतेफ्रोजनप्रोसेस्ड खाद्यपदार्थाचा वापर हा आहारात घटलेली गुणवत्ता दर्शवतोशक्य तितके ताज्या भाज्यापदार्थ वापरणेमहत्वाचेबऱ्याचदा आपण बेहिशोबी स्वयंपाक करुन तो फ्रिजमधे साठवून आठवडाभर चालवतोहि स्वतःची शुद्धफसवणुक आहेअन्न वाया जाऊ नये हा उदात्त हेतु मान्य आहेतो असलाच पाहीजेपरंतु अन्नाचे प्रमाण कमी पडले तरचालेलपण जास्त व्हायला नकोही वृत्ती पाहीजेमुळात सगळ्यांनाच अन्न गरजेपेक्षा जास्त खायची सवय असतेचत्याततुमचे आतिथ्य तुम्हाला जास्तीचे अन्न तयार करवतेमग शिळ्या अन्नाने भरलेले फ्रिज तुम्हाला स्वयंरयपाकापासुन आरामदेते ह्या भ्रमात तुम्ही आठवडा काढतामुळात शिळे अन्न उरु नयेउरल्यास ते शक्यतो फेकु नयेकारण अन्नास आपणपरब्रम्ह मानतोपरंतु मुळ प्रयत्न स्वयंपाक तंतोतंत व्हावा ह्याकडे असावा.
    • अन्नावर जितकी प्रोसेसिंग केली तितके त्याचे मुलभुत गुणधर्म “शक्यतो” कमी होतातत्यामुळे मॅगीचिप्स किंवाबाजारात मिळणारी वेगवेगळी साॅसटिनमधे बंद असलेली कडधान्य किंवा मायक्रोव्हेवेबल रेडीमेड एअरटाईट करी(भाज्या). ह्या सगळ्या प्रकारांमधे एक साम्य आहेते म्हणजे अन्न टिकवण्यासाठी त्यात वापरले जाणारे रासायनिक घटकहे घटक कायद्यात जरी बसत असतील  अन्न टिकत जरी असेल तरीहीबहुतेक अन्न हे जिवंत पदार्थ आहेत  वेळेनुसारत्यांचा क्षय  दर्जा कमी होतोच होतोवरुन हे रासायनिक घटक तुमच्या शरीराचे नुकसान करतातह्या नुकसानीचे प्रमाणकमीअधिक असु शकते परंतु तुमची लाइफस्टाइल सतत प्रोसेस्ड फुड किंवा बाहेरचे फुड खायची असेल तर परिणामप्रखरतेने दिसतात
    • वरील प्रोसेसींगच्या आधारावर शक्यतो सर्व फुड आउटलेट्स हाॅटेल्स ही कमीअधिक प्रमाणात फ्रोजनप्रोसेस्ड फुड तसेचकायद्याने मान्य असे केमिकल खाण्यात वापरतातत्यामुळे बाहेर खाणे शक्यतो टाळापुर्णपणे बंद होणं अशक्य आहेपरंतु प्रयत्न त्यादिशेने व्हावारोडवरील छोट्या वडापावच्याइडलीच्या दुकानात तुम्हाला प्रोसेस्ड फुडकेमिकल्सचा वापरशक्यतो आढळणार नाहीत्यांचे अन्न दर दिवशी शिजवून संपत देखील असेलचपरंतु मोठ्या हाॅटेलात नक्कीच ह्याच्याविपरीत आढळेल
    • स्वयंपाकात तेलाचा वापर किती करता हे जेवढं महत्वाचे तेवढंच तेल कुठलं वापरता हे ही महत्वाचेफार रिफाईंड तेलवापरुन बरीचशी पोषक तत्वे आपण घालवतोस्वयंपाकात शेंगादाणातीळसरसोॲालिव्हसुर्यफुलकरडी तेल उत्तमतेलाचा वापर कमी करा परंतु रिफाईंड टाळता आले तर उत्तमप्रमाणाची नोंद करत चलाजसे कळेल की कमी तेलातभागतेतसे आहारातील तेल कमी करत चला.
    • जेवणात डेअरी प्राॅडक्टस शक्यतो गायीच्या दुधाचे पुर्ण फॅट असलेले वापरावेयोग्य प्रमाणात तुपदेखील अवश्य वापरावेदुधात A2 milk हा प्रकार मिळत असल्यास वापरावात्याचे विशेष असे की गायींच्या पिढ्या वाढवण्यासाठी ते एकचगोऱ्हा (बैलवापरत नाहीत्यामुळे जिन्स दुषित होत नाहीत   पचणारे प्रोटिन्स दुधात आढळत नाहीतसाध्या प्रकारच्यागायीमध्ये बऱ्याच वेळा एकच गोऱ्हा हा त्यापासुन जन्मलेल्या गायीला देखील प्रजननासाठी वापरतातथोडक्यात अन्नाच्यागुणवत्तेबाबतीत तुमचा शास्त्रज्ञ होऊन प्रत्येक बाबतीत तुम्हाला असे रिसर्च करायला हवे
    • गुणवत्तेमधे एक शेवटचा महत्वाचा मुद्दा मी मांडत आहे तो म्हणजे तुमच्या खाण्याच्या सवयी ह्या स्थानिक नैसर्गिक ऋतुंशी संलग्न असाव्यातशिमल्याला बर्फ पडला म्हणुन चिपळुणला जाड पांघरूण घेणे जितके तर्क सोडुन होईल तसेचपरदेशी ओट्स (oats) नाश्त्यात खातात म्हणुन भारतात ते खाणे तर्कशुद्ध नाहीभारतात खाण्यात वैविध्य इतकं आहे कीइतर देशांकडे पाहण्याची गरज नाहीत्याउपर हौस म्हणुन कधीतरी ओट्स खावे वाटणे ही बाब वेगळी

  1. अन्नाची विविधता  प्रमाणह्यात तुमच्या दिवसभराच्या आहारात येणारी विविध पीठभाज्यांचे प्रकारतसेच कच्च्या शिजवलेल्या अन्नाचा योग्य समतोलसमन्वयअन्नात लिक्विड तसेच फळांचा योग्य उपयोग ह्याचा आपण सखोल अभ्यासकरणार आहोत

  • तुमच्या जेवणात पोळी ऐवजी तुम्हाला भाकरी वापरता येईल कात्याचे योग्य परिणाम तुम्हाला  दिसतीलपोळी वापरु नकाअसे नाही परंतु भाकरीला प्राधान्य द्यातसेच इतर पिठांचा वापर होतो कानाचणीसातुराजगीराज्वारीबाजरीजोंधळेमकाइतर अनेक पिठांचे प्रकार शोधात्यांची गुणधर्म शोधामग त्याचा वापर सुरु कराभारतीय आहार पद्धतीत विविधता हीयोग्य कारणासाठी आहे
  • जेवणात अनेक मोड आलेले कडधान्य (मुगमटकीहरबराचवळीवाटाणे कच्चे किंवा वाफवुन खातात काअनेक बीयादेखील भीजवुन मोड आणुन खातातयात ओमेगा - (डोक्याच्या विकासासाठी तसेच डिप्रेशन anxiety सारखे दुर्धर आजारयांचा परिणाम कमी होण्यासाठीभरपुर प्रमाणात असतेसुर्यफुलभोपळा बिया मी स्वतः वापरतोतीळकारळजवस अश्याबियांची चटणी किंवा नुसते भाजुन नास्त्यावर किंवा भाजीत टाकुन खाणे उत्तमअश्या चटण्यांमुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतोह्या गोष्टी किती वापरता ह्यांचे प्रमाण नोंद करत जा
  • Iron (लोहअसलेले पदार्थ लक्षात ठेवुन जेवणात वापरापालकबीटदाळी यांचा योग्य उपयोग करुन रक्तातील लोह प्रमाण(हिमोग्लोबीनचांगले ठेवास्त्रीयांना मासिक पाळीमुळे येणारा अशक्तपणा  हिमोग्लोबीन कमी होण्याने प्रमाण यांमुळेआहारात लोहयुक्त साहित्य पदार्थ वापरणे महत्वाचेया गोष्टींचा वहीत आढावा घ्याकारण नियमित थकवा  अशक्तपणानिरुत्साह ह्यामागे शक्यतो B12 किंवा haemoglobin (लोहयाची कमतरता असतेलोखंडी भांडी स्वयंपाकात वापरण्यामागेलोह अन्नातून मिळणे हा हेतु आहेचत्याकडेदेखील लक्ष वळवा.
  • (मीठ  लावलेलेकाजु बदाम शेंगदाणेफुटाणे ह्या गोष्टींचा (स्नॅक्सखाण्यात वापर असावापरंतु फार भाजणे तळणे असु नयेकिती वापरता ह्या गोष्टी ह्यांचे प्रमाण नोंद करत जासाधारण एक ते दोन मुठ दिवसभरात संध्याकाळी  च्या आधी बरंहेचमहत्व लाह्यांचेलाह्यांना फार बटर किंवा मसाले लावुन तयार करु नयेमकाज्वारीगहुराजगीरा ह्यांच्या लाह्या अत्यंत पोषकअसतातघरघुती भेळ करतांना मी मोड आलेले धान्यलाह्याखिसलेली पत्ताकोबीकाकडीगाजरटोमॅटोकांदाकोथिंबीरमीरचीथोडं काळंमीठ किंवा चिमूटभर मिरेपावडर चाटमसाला हे वापरतोकधी त्यात दही असतेहे पोषक असतेच पण तुमचीभेळीची तल्लफ पण मिटवते 🤩
  • जेवणात भात खाऊ नये असे मी मुळीच म्हणणार नाहीभात बंद केल्याने वजन कमी होते हे जरी खरे असले तरीजेव्हा तुम्हीतुमच्या शारीरीक श्रमाचे प्रमाण वाढवाल तेव्हा हीच कार्बस (कॅलरी/कर्बोदकेउपयोगात पडतीलतसेच जेवणात पोट भरलेलेवाटणे ही महत्वाचे आहेत्यामुळे भात महत्वाचा आहेमात्र भाताचे प्रमाण नियंत्रित करणे काळाची गरज आहेभाताचे नियंत्रणमधुमेहासारखे रोग तसेच पोटाभोवतीची चरबी कमी करेल
  • जेवणात भातापेक्षा वरण जास्त हवेएक डाव चमचा भात असल्यास तिन डाव चमचा वरण असावेदाळीतुन तुम्हाला प्रोटीन्समिळतातत्याचप्रमाणे पोळ्यांभाकरीपेक्षा जास्त प्रमाण भाजी  कोशिंबीरीचे असावेएका पोळीच्या घासामागे भाजीकोशिंबीरमोड आलेली कडधान्यचटणी यांचे प्रत्येकी दोन घास असावेमुळात हे प्रमाण रफ असले तरी मी स्वतः वापरतोत्याचा फायदाहा कीवरणभाजीमोड आलेले धान्यकोशिंबीर आपोआप कमी शिजलेले अन्न आहारात वाढवेलपरिणामतः तुम्ही घासबऱ्याच वेळा चावालअन्नातील कार्बोहायड्रेट्स योग्य तऱ्हेने वितरीत  नियंत्रित होतीलकोथिंबीरीला व्यवस्थित फोडणी दिलेलीअसावीकोथिंबीरीला दही घातल्यास कफनाशासाठी चिमूटभर मिरपुड घालावी
  • आहारात ताकाचे प्रमाण खुप महत्वाचेदुपारी उन्हाच्या वेळी ताकासारखं पेय नाहीताकातील काही गुणधर्म समजुन घेणेआवश्यक आहेताकवर योग्य संस्कार केल्यास कुठल्याही प्रकृतीस ते घेता येतेताकाचे सौंदर्यआरोग्य तसेच पचनसंस्था मज्जासंस्थेच्या सुधारणेत अनेक फायदे आहेतवातविकारात ताक थोडे आंबट सैन्धव मिठ असलेलेपित्त विकारात थोडी साखरत्यात घुसळलेलेकफविकारात लोणी काढलेले ताक त्यात सुंठमिरीपिंपळीसैंधव मीठ थोड्या प्रमाणात (एका ग्लासमध्येएक चमचाघालून प्यावेमी बरेच दिवस संध्याकाळी जेवणाऐवजी ताक पितोमात्र रात्री फार उशीरा पिणे टाळतोमी त्यातफोडणीत जिरे खिसलेलं आलंकोथिंबीरबारीक मीरचीमीरपुडसैंधवसाखर घालतो (थोडक्यात मठ्ठा करतो). हवी ती चवदेतोपण पोटभर पितो.
  • तुमच्या दिवसभरात आहाराचा एक भाग हा फळांचा असणे आवश्यक आहेपाश्चिमात्य देशात दिवसामागे पाच फळं खा असेन्युट्रिशनिस्ट सांगतातत्यातील साखर ही साध्या साखरेसारखी बाधत नाहीफळांमधे मात्र विविधता हवीनुसत्या केळी खाऊनचालणार नाहीडाळींबअंजीरपपईटरबूजखरबूजसिताफळद्राक्षसफरचंदसंत्रीमोसंबीपेरुबोरंजांभळकरवंदअनेक बेरी (स्ट्राॅबेरीरास्पबेरीब्लुबेरी..) अशी अनेक फळ पाहीजेतवजनाचे काटे हलवायचे असल्यास  पचनसंस्थेला चांगलीकरायची असल्यास आठवड्यातुन एक दिवस पुर्ण फळांवर राहायला शिकासुरवातीस हवी तेवढी फळ खानंतर त्यांना प्रमाणातबांधायला सुरु करामधुमेह असलेल्यांनी फलाहाराचे नियमन केले पाहीजेमात्र टाळु अजिबात नये.
  • मीठसाखर यांचे प्रमाण आपण गरजेपेक्षा अधिक वापरतोकारण आपल्या खाद्यपदार्थाची रेसीपी ही शक्यतो जिभेला साजेशीअसतेआरोग्यास नाहीशक्य असल्यासचहा काॅफित साखर पुर्णपणे बंद करावीतसेच मीठाचे प्रमाण जितके कमी करालतितके चांगलेमुलतःसर्व अन्नात नैसर्गिक मीठ असतेशरीरास तेवढेच पुरेसे असते (हो!!). परंतु पुन्हा जिभेसाठी प्रत्येकपदार्थात मीठ चवीसाठी घातले जातेत्यामुळेच मीठाचे प्रमाण कमीतकमी चांगलेमीठ कमी केल्याचा एक फायदा हा की शरीरफॅट्सचे विघटन लवकर करते  शरीराची फॅट्स साठवण्याची प्रक्रिया संथावते.
  • आवळाबडीसोफअद्रकओली हळदआवळपुदीनादालचिनीया पदार्थांचा वापर चहा म्हणुन करता येतो का पहामी स्वतःह्यातील कुठलीही एक वस्तु केटलमधे गरम केलेल्या पाण्यात झाकुन  मिनीट भिजवत ठेवतोकाही मिनिटांनी तेच गरम पाणी(विना दुध किंवा विना चहापावडरहर्बल चहा म्हणुन पितो (हा कार्यक्रम दिवसभरात कधीही चालतो). वाटल्यास त्या चहात मीमध टाकतोपरंतु मागच्या १० वर्षात मी साधा चहा किंवा काॅफि  घेता असाच हर्बल चहा घेत आलो आहेत्याचे अनेक फायदेआहेतते आपण पुढे काही लेखांमधे जाणुन घेऊतसध्या मात्र नाॅर्मल चहाकाॅफी ऐवजी हा प्रयोग करता येतो का पहातुमच्यासाखरेच्या प्रमाणात लक्षणिय घट झाल्याचे तुम्हाला दिसेलपर्यायाने वजन कमी होण्यास मदत होईलवरील हर्बल चहाचादुसरा फायदा हा कीह्याच्या सेवनाने पचनसंस्थेचे काम सोपे होतेतुमच्या आवडीनुसार त्या हर्बल चहात दुसरे काही सात्विकपदार्थ घालु शकता
  • आरोग्यदायी अन्न समजण्यासाठी (खास पुरुषांसाठी: ) स्वतः स्वयंपाक करता येणे खुप गरजेचे आहेतुम्हाला तेव्हाच कळेलकिती प्रमाणात कुठल्या गोष्टी शरीरात जात आहेतमी स्वतः उत्तम स्वयंपाक करतो  रोज माझा डब्बा मी तयार करतोत्याचामला नेमकं मी काय खातोय हे कळण्यात फायदा होतोअगदीमसालेमीठ तेलवैविध्य सर्व काही नियंत्रणात येते तुम्हीत्यासाठी आहारावररेसीपींवर पुस्तक वाचाक्लासेस करा किंवा बायकोच्या हाताखाली काम करापाककला शिकाल तरतुमच्या आरोग्याची बरीच गुपित तुम्हाला कळतील

गृहपाठ:
  • जेवणाची वेळ नोंद करुन ठेवणे (महिनाभर त्यावर लक्ष द्या). शक्यतो निरामयच्या वहीत नोंद कराशक्यतो -१० मिनीटापेक्षाजास्त वेळ चुकुन नका.
  • संध्याकाळी जेवणाऐवजी ताकाचा किंवा फळांचा प्रयोग कराएका आठवड्यासाठी करायला हरकत नाहीताकाचे विविधप्रकार वरती सांगितले आहेतचप्रयोगाआधी तुमचे वजन याची नोंद निरामय वहीत करुन ठेवा
  • ज्यांना व्ही शेप बाॅडी हवी त्यांच्या दिवसभराच्या आहाराचे प्रमाणदेखील व्ही शेप हवेम्हणजे जसा दिवस जाईल तसे आहारनिमुळता व्हायला हवादिवसभराच्या आहाराची वहीत नोंद घ्याहा सरळ व्ही आहे का उलटा व्ही पहा?
  • फ्रिज  फ्रोजन फुड वापर कमी करणेजंक फुड कमी करणेमुळात किराणा सामानाच्या यादीतच त्याला कात्री लावा
  • गरम पाण्याचे हर्बल चहाचे प्रयोग तसेच फलाहाराचे प्रयोग हे शरीर शुद्धी तसेच वजन कमी करण्यास उपयुक्त आहेतरोजच्याएका चहाला टाळुन हर्बल चहाचा मार्ग प्रशस्त कराप्रयोग म्हणुन तर कराचपुढे फायदे जाणवल्यास नियमित करा
  • सप्लिमेंटस घेत असल्यास त्याचे स्रोत आहारात शोधणे  हळुहळु सप्लिमेंटस बंद करणेडाॅक्टरांनी सप्लिमेंटस दिल्याअसल्यासत्यांच्याशी चर्चा करुनच त्या बंद करा
  • शाकाहाराचा विचार करावजनात ह्याने आयती घट होते हा बऱ्याच जणांचा अनुभव आहे
  • आठवड्यात काही दिवस गरजेपेक्षा कमी स्वयंपाक करा  काहीही शीळं उरणार नाही असा प्रयत्न करा. (अर्थात शीळं उरु नयेम्हणुन भुक नसतांना उरलेले अन्न संपवणे चुकीचेच आहे). 
  • अन्नाची गुणवत्ता कुठे वाढवतां येते का याचा विचार करा  निरामय मधे त्याची नोंद करा
  • मीठ  साखरेचे प्रमाण याची नोंद ठेवत चला  ते प्रमाण अर्ध्यावर येईल याचा प्रयत्न करा९९.९९लोक मीठसाखरगरजेपेक्षा जास्त खातात त्यामुळे मी हे अर्ध्यावर येण्याचे आवाहन निर्विवादपणे करु शकतो
  • पोळीभाजीकोशींबीरचटणीमोड आलेले धान्यवरण यांचे प्रमाण नोंदीत चलावर सांगीतल्याप्रमाणे त्या प्रमाणात ताटाचीविभागणी करा

पुढील लेखात आपण शरीराचे मुल्यमापन करणार आहोततोपर्यंत वरील गृहपाठ तयार ठेवा.

आपला आरोग्यवर्धिनी सेवक
© राहुल करुरकर

No comments:

Post a Comment